छत्रपती संभाजीनगर. :: जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु आहे. विविध तपासणी व जप्ती कारवाईत आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत  २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली असून तब्बल ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी केली आहे, अशी माहिती आचारसंहिता कक्षातून मिळाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात स्थिर सर्व्हेक्षण पथकांमार्फत करण्यात आलेल्या वाहन तपासणीचा तपशिल याप्रमाणे- राजकीय पक्षांची वाहने ३८४, खाजगी वाहने १७ हजार ५, सार्वजनिक वाहने ४९३, शासकीय वाहने १७५, पोलीस यंत्रणेची वाहने ९२, रुग्ण्वाहिका व अत्यावश्यक सेवेची वाहने ८३, वैद्यकीय विभागाची वाहने ४४, बॅंकांची वाहने २४ अशी एकूण १८ हजार ३०० वाहने तपासण्यात आली आहेत. तर आचारसंहिता सुरु झाल्यापासून आजतागायत ३ लाख १७ हजार ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर भरारी पथकांनीही १७८५ वाहनांची तपासणी केली आहे. तसेच २८२ ठिकाणी अचानक भेटी दिल्या आहेत.

जप्तीच्या कारवाईत जिल्ह्यात आतापर्यंत ६ कोटी २३ लाख ८१ हजार रुपयांची रोकड जप्ती झाली आहे. तसेच ५५ हजार २११.६२ लिटर्स दारु (किंमत १ कोटी ४६ लाख १४ हजार रुपये), १ कोटी ४ लक्ष ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ,  १८ कोटी ४२ लक्ष ३६ हजार रुपयांचे मौल्यवान धातू, १ कोटी ९६ लक्ष ५३ हजार रुपयांचे भेट वस्तू असा एकूण २९ कोटी १४ लक्ष २४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची जप्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *