छत्रपती संभाजीनगर. :: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. 4 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत, पण त्याआधीच अपक्ष उमेदवार त्याची पत्नी, बहीण आणे मेहुण्याचं अपहरण करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचं अपहरण करण्यात आलं आहे. शिर्डीहून नाशिककडे जाताना अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात राजू शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचं अपहरण झाल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. झिरो नंबरने हा गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. उमेदवार राजू शिंदे यांचे सहकारी मंगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गट आणि अपक्ष उमेदवार यांच्या नावात साधर्म्य आहे. संगमनेर शहराजवळील समनापूर गावाजवळ घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून राजू शिंदे नावाच्या अपक्ष उमेदवाराचं अपहरण झाल्याची तक्रार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मात्र राजू शिंदे यांनीच आपलं कुठलंही अपहरण झालं नसून आपण संभाजीनगरला आपला अर्ज मागे घेण्यासाठी जात असल्याचे म्हटला आहे. त्यामुळे कोणीही अफवा पसरू नये असं आवाहन अपक्ष उमेदवार अर्ज भरलेले राजू शिंदे यांनी म्हटलं आहे…