छत्रपती संभाजीनगर. :: शहरात एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत तीन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा समावेश असून याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएकडून देश विघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभरात कारवाई सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात आज पहाटेपासून महाराष्ट्रामध्येही तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी आणि कारवाई केली आहे. यामध्ये जालना शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून आज सकाळी चार वाजेपासून एनआयएकडून चौकशी सुरु होती. चौकशी सुरू असलेला तरुण हा चमड्याचा व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आणि किराडपुरा भागामध्ये एनआयए तसेच एटीएसने छापेमारी केली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौका जवळून एक आणि एन सिक्स परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, असे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *