छत्रपती संभाजीनगर. :: बुद्धलेणीच्या पायथ्याचे विपश्यना केंद्र आणि विहार हे विद्यापीठ जागेच्या बाहेर आहे. तरीही खोडसाळपणे या पवित्र स्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावली आहे. याच्या पाठीशी कोण आहे, याचा शोध घ्यावा, या स्थळाचा बौद्ध सर्किटमध्ये समावेश करून शासनाने तेथे पुरेशा सोयी-सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, असे आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रकाश निकाळजे, गौतम खरात, गौतग लांडगे, अॅड. रमेशभाई खंडागळे, संजय जगताप, दीपक निकाळजे, अरुण बोर्डे आदींनी सांगितले की, मागील ५५ ते ६० वर्षांपासून बुद्धलेणीच्या पायथ्याशी बुद्धविहार आणि विपश्यना केंद्र आहे. दरवर्षी याठिकाणी लाखो देश विदेशातील बौद्ध अनुयायी, अभ्यासक भेट देतात. विशेष म्हणजे, वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या जागेवर हे स्थान असून, विद्यापीठाचा या जागेशी कसलाही संबंध नाही. तरिदेखील बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक जगताप यांनी अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस कोणाच्या सांगण्यावरून बजावली. या घटनेमुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या आहे. या घटनेच्या मागील सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा. या बुद्धलेणी, विहार आणि विपश्यना केंद्राचा समावेश बौद्ध सर्किटमध्ये करून शासनाने तिथे पुरेशा सुविधा द्याव्यात, याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा द्यावी, बुद्धलेणी व परिसराला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, या अन्य मागण्यासाठी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ‘धम्मभूमी के सम्मान में, हम सब मैदान मे’ हा विराट मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर नेला जाणार आहे.

हा मोर्चा क्रांतिचौक येथून निघून पैठण गेट- टिळक पथ- गुलमंडी – सिटीचौक- म.गांधी पुतळा शहागंज – हर्ष नगर विभागीय आयुक्त कार्यालय, छ. संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित होईल भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे मोर्चाचे नेतृत्व करणार असून महाराष्ट्र भरातील बौद्ध भीक्खु या मोर्चात सहभागी होणार असल्याचे भन्ते संघप्रिय यांनी सांगितले.बौद्धलेणी बचाव मोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट तट विसरून सहभागी होणार असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक होईल व किमान 2 लाख लोक मोर्चात सहभागी होतील असा अंदाज भीक्खु संघाने व्यक्त केला आहे.

यावेळी भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, ,भंते बोधीधम्म,भंते उपाली भंते निर्वाण, भंते आनंद यांनी भीक्खु संघाच्या वतीने भूमिका मांडली तर प्रकाश निकाळजे, दौलत खरात,रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, संजय जगताप, गौतम खरात, किशोर थोरात, अरुण बोर्डे, बंडू कांबळे, जालिंदर शेंडगे,दिपक निकाळजे, सचिन निकम,आनंद कस्तुरे, गुल्लू वाकेकर, विजय वाहुळ,अमित वाहुळ, मुकेश खोतकर, विजय शिंदे, सचिन जोगदंडे,सोनू नरवडे, कपिल बनकर, संतोष चव्हाण नागेश जावळे, दत्ता जाधव, नागेश केदारे, आनंद बोर्डे, मेघानंद जाधव, गंगा पाईकराव, मिलिंद दाभाडे, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, अमर हिवराळे, पूनम गंगावणे,राहुल अंकुशे, आशिष मनोरे, मुकुंद जंजाळे, हरीश खेडकर, कमलेश नरवडे,सुरेश मगरे,विजय शिंगारे, अनामी मोरे,सचिन बनसोडे, राष्ट्रपाल गवई,संदिप वाहुळ, नितीन निकाळजे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *